Finding the Right Cooking Oil: Why Wood-Pressed Oils Stand Out Finding the right cooking oil…
पारंपरिक घाणीतून काढलेल्या तेलाचे फायदे
पारंपरिक घाणीतून काढलेल्या तेलाचे फायदे
घाणी म्हणजेच तेलबियातून तेल काढण्यासाठी पूर्वी वापरली जाणारी पारंपरिक पद्धत. गावाकडच्या भागात स्वयंपाकासाठी लागणारं तेल ही अशीच घाणीतून काढून वापरलं जायचं.
या घाण्या मुख्यतः वागई लाकडापासून तयार केलेल्या असतात. पूर्वी बैलांच्या मदतीने या घाण्या चालवल्या जात असत. आजच्या घडीला मात्र या घाण्या डिझेल किंवा वीजेवर चालवण्याची सोय केली आहे.
माझे आजोबा, काका—सगळेच आपल्या बैलांच्या मदतीने पारंपरिक घाणी चालवून तेल काढायचे आणि त्याचा व्यवसाय करत होते.
पण जसजशी यंत्रांद्वारे तेल काढण्याची आधुनिक पद्धत आली, तसे पिशवीत मिळणाऱ्या रिफाइन्ड तेलांचा जमाना सुरू झाला. त्यामुळे १९८० नंतर बैल लावून तेल काढण्याची पद्धत हळूहळू मागे पडली.
आजच्या काळात डायबेटिस, लठ्ठपणा, बीपी अशा अनेक आजारांनी त्रस्त लोक पुन्हा नैसर्गिक आहाराकडे वळू लागले आहेत.
हीच गरज ओळखून मी पुन्हा एकदा पारंपरिक घाणी पद्धतीने तेल तयार करायचं ठरवलं.
१. लोखंडी घाणीतून काढलेलं तेल
लोखंडी घाण्या वेगानं फिरतात. त्यामुळे त्यातून काढलेलं तेल खूप गरम होतं.
अशा प्रकारे तेल गरम झालं की, त्यातले पोषणमूल्य नष्ट होतात. त्यामुळेच म्हटलं जातं की, एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरू नये.
२. लाकडी (वागई) घाणीतून काढलेलं तेल
लाकडी घाणी हळूहळू फिरवल्या जात असल्यामुळे तेल गरम होत नाही.
त्यामुळे तेलातले नैसर्गिक घटक तसेच टिकून राहतात.
त्यात थोडं गुळाचं पाणी (किंवा खडीसाखर/गुळ) घालतात जे तेलाच्या उष्णतेला समतोल ठेवतं. अशा घाणीतून काढलेलं तेल गाळलं जात नाही.
ते पितळेच्या भांड्यात भरून उन्हात ठेवलं तर ते आपोआपच स्वच्छ होतं. त्यामुळे त्यातलं नैसर्गिक पौष्टिकत्व तसंच राहतं.
यंत्रातून काढलेल्या तेलात मात्र बियांतले उपयुक्त घटक गाळून टाकले जातात. त्यामुळेच रिफाइन्ड तेल दिसायला खूपच चमकदार वाटतं.
कंपन्या त्या तेलात विशिष्ट रंग, वास आणि चव कृत्रिमपणे घालतात. त्यामुळे त्या तेलाचं आयुष्य जास्तीत जास्त ३ महिनेच असतं.
पण घाणीचं तेल रंगानं थोडंसं फिकट दिसलं तरी त्याचा वास अप्रतिम असतो आणि ते संपूर्ण वर्षभर खराब होत नाही.
या तेलात बनवलेलं अन्न आरोह्यदायक असतं.
घाणी चालवताना तेल तापत नाही, त्यामुळे त्याचा नैसर्गिक वास व चव जशीच्या तशी राहते.
एकदा जर कुणी या तेलात बनवलेलं जेवण खाल्लं, तर त्याची चव आयुष्यभर लक्षात राहते.
उदाहरण
उदाहरण द्यायचं झालं, तर एका कुटुंबात दर महिन्याला ५ लिटर रिफाइन्ड तेल वापरलं जातं. तिथेच घाणीचं तेल वापरल्यास फक्त ३ लिटरच पुरेसं ठरतं.
कारण हे तेल दाट आणि शुद्ध असतं, त्यामुळे कमी तेलातच स्वयंपाक होतो.
एका लाकडी घाणीतून रोज २८ लिटर पर्यंतच तेल तयार करता येतं.
या घाणीतून फक्त शेंगदाण्याचं नाही, तर नारळाचं, तीळाचं असं वेगवेगळ्या बियांपासून तेल काढता येतं.
ही एक पारंपरिक उद्योगश्रेणी असल्यामुळे सरकारने थोडं आर्थिक पाठबळ दिलं, तर ही घाणी पद्धती पुन्हा जोमात येईल.
सरकारने अशा पारंपरिक आणि आरोग्यदायी उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन द्यायला हवं.
आम्ही शुद्ध, नैसर्गिक तेल – शेंगदाणा, तीळ, नारळाचं तेल – गावातल्या शेतकऱ्यांकडून थेट तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय.
आजकाल लोकांमध्ये पारंपरिक आहार, आरोग्यदायी जीवनशैली याबद्दल जाणीव वाढतेय. त्यामुळे लाकडी घाणीला पुन्हा पुनर्जन्म मिळतोय असंच म्हणायला हवं.
कधी काळी घराघरात घाणी चालायच्या, बैल लावून शुद्ध तेल तयार व्हायचं.
पण नंतर जनावरांची संख्या कमी झाली, माणसांनी या पद्धतीकडे दुर्लक्ष केलं आणि या परंपरेचा ऱ्हास झाला.
त्यानंतर यंत्रांनी (रोटरी मशीन) घाण्यांची जागा घेतली.
पण आज पुन्हा घाण्या नव्यानं उभ्या राहतायत.
आजही काही ठिकाणी, बैलांशिवाय, लहान विद्युत मोटर लावून, वागई लाकडाची घाणी वापरून तेल काढलं जातं.
पहिल्या प्रतीचं नैसर्गिक बियांचं तेल, पारंपरिक पद्धतीनं तयार केलं जातं.
आणि गावच्या शेतकऱ्यांकडून थेट तुमच्या घरापर्यंत ते पोचवतोय.
घाणीचं तेल हवंय का?
भेट द्या:
👉 www.StandardColdPressedOil.com






